करणखेडा येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिराचा समारोप

मारवड ता. अमळनेर येथील कै. नानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयाचे एनएसएस दत्तक गाव करणखेडा येथे दि. 25 रोजी राष्ट्रीय सेवा योजना विशेष संस्कार शिबिराचा समारोप झाला.

 

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. आबासो. देविदास शामराव पाटील (उपाध्यक्ष ग्रामविकास शिक्षण मंडळ मारवड) हे होते.

सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून माननीय आबासो. श्री. जयंतराव मनसाराम पाटील (अध्यक्ष ग्रामविकास शिक्षण मंडळ मारवड) हे उपस्थित होते. तसेच माननीय श्री.भाऊसो. युवराज काशिनाथ पाटील (संचालक), माननीय श्री. आबासो.विश्वासराव विनायकराव पाटील( संचालक), माननीय श्री. दादासो. राजेंद्र फकीरा पाटील (संचालक) माननीय श्री. भैय्यासो. दिनेश वासुदेव साळुंखे (संचालक) नानासो. के. व्ही. पाटील( प्रशासकीय अधिकारी) ,दादासो.महेंद्र सुरेश पाटील (उपसरपंच करणखेडा) श्री. आबासो. सुधाकर यशवंत पवार (माजी सरपंच करणखेडा) श्री. दादासो. श्यामकांत बळीराम पाटील,नानासो. लक्ष्मण जुलाल पाटील ,दादासो.सौरभ गुलाबराव भागवत, श्री. अण्णासो. मधुकर कौतिक पाटील,दादासो. गणेश शांताराम गुरव, श्री. नंदकिशोर शंकरराव पवार, श्री. दिलीप यशवंत पाटील, श्री.प्रवीण यशवंत पाटील ,श्री. राकेश बारकू पाटील तसेच गावातील ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते कार्यक्रमास उपस्थित होते

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाजमीन पठाण हीने केले.

तर प्रास्ताविक प्रा. डॉ. सतीश पारधी (एनएसएस कार्यक्रम अधिकारी ) यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. व्हि.डी. पाटील, प्रा. डॉ.नंदा कंधारे (एनएसएस महिला कार्यक्रम अधिकारी) प्रा. किशोर पाटील उपस्थित होते.

याप्रसंगी एनएसएस स्वयंसेवकांना माननीय आबासो.

देविदास शामराव पाटील आणि दादासो. शामकांत बळीराम पाटील यांनी अनमोल असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार कोमल पाटील हिने मानले.

तसेच एनएसएस स्वयंसेवकांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी दादासो. गणेश शांताराम गुरव यांच्याकडून विद्यार्थ्यांना ट्रॉफी भेट देण्यात आल्या.

युथ फाॅर माय भारत व युथ फॉर डिजिटल लिटलसी, स्वच्छ भारत अभियान विशेष मोहीम, पाणी व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, माझी वसुंधरा अभियान ,मतदार जनजागृती अभियान, माय भारत युवा पोर्टल नोंदणी ,जागो ग्राहक जागो, अन्नपदार्थ सुरक्षा जनजागृती मोहीम ,दत्तक गावातील कार्याचा उजाळा इत्यादी नियोजित प्रकल्प पूर्ण करून राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी संस्कार शिबिर संपन्न झाले .

राष्ट्रगीताने सदर कार्यक्रमाची सांगता झाली.

याप्रसंगी महाविद्यालयीन सर्व प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

India@2022

  • Related Posts

    अमळनेर नगरीत पहिल्यांदाच खान्देश साहित्य संघाच्या वतीने १७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता एल आय सी कॉलनी खुला भूखंड , लक्झरी बस स्टॉप समोर धुळे रोड अमळनेर येथे भव्य ‘आखाजी महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले आहे.

    या महोत्सवाच्या माध्यमातून आपल्याला खान्देशी लोककला, गाणी आणि परंपरांचे दर्शन घडणार आहे. विशेषतः महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे म्हणून अध्यक्ष प्रा.…

    अमळनेर नगरीत पहिल्यांदाच खान्देश साहित्य संघाच्या वतीने १७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता एल आय सी कॉलनी खुला भूखंड , लक्झरी बस स्टॉप समोर धुळे रोड अमळनेर येथे भव्य ‘आखाजी महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून आपल्याला खान्देशी लोककला, गाणी आणि परंपरांचे दर्शन घडणार आहे. विशेषतः महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे म्हणून अध्यक्ष प्रा. डॉ. सदाशिव सुर्यवंशी (केंद्रीय अध्यक्ष, खान्देश साहित्य संघ महाराष्ट्र) तर उद्घाटक म्हणून मा. राजेशजी पांडे ( प्रदेश सरचिटणीस, भाजपा) उपस्थित राहणार आहेत. आखाजी महोत्सवाचे स्वागताध्यक्ष ,श्री. अशोक आधार पाटील (सभापती, कृ.उ.बा.स. अमळनेर) असतील तर ग्रामीण संस्कृती , आखाजी महोत्सव या विषयावर प्रमुख वक्त्या प्रा. डॉ. योगिता पाटील (अहिराणी लेखिका, धुळे) प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. हा आखाजी महोत्सव म्हणजे महिलांसाठी तर आनंदाची पर्वणी असेल. यावेळी खापर वरील पूर्ण पोळ्या बनवण्याची स्पर्धा , झोक्यावरील अहिराणी गीतांची स्पर्धा , गौराई च्या अहिराणी गाण्याची स्पर्धा , घट्यावरील गाण्याची स्पर्धा , वेशभूषा आणि एक मिनिटात उखाणे आदी स्पर्धा घेण्यात येणार असून प्रत्येक विजेत्याला अनुक्रमे गौराई आणि प्रथम ५ हजार ,द्वितीय ३ हजार , तृतीय २ हजार आणि प्रमाणपत्र बक्षीस देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे अहिराणी शब्द व संस्कृती वाङ्मयावर चालता बोलता प्रश्न मंजुषा कार्यक्रम देखील होणार असून बक्षिसे दिले जातील. यासह ग्रामीण भागातील बचत गट अस्सल गावराणी खाद्य पदार्थ आणि वस्तूंचे विविध स्टॉल देखील लावणार आहेत. या आनंदी महोत्सवास प्रमुख पाहुणे म्हणून मा. खा. स्मिताताई उदय वाघ, (जळगांव लोकसभा), मा. आ. अनिल भाईदास पाटील, (माजी मंत्री, अमळनेर विधानसभा ) ,मा. कृषिभूषण साहेबराव पाटील, (माजी आमदार, अमळनेर ), मा. डॉ. बी. एस. पाटील, (माजी आमदार, अमळनेर विधानसभा ),मा. शिरीष हिरालाल चौधरी,( माजी आमदार, अमळनेर विधानसभा ) ,मा. डॉ. परीक्षित बाविस्कर, (लोकनियुक्त नगराध्यक्ष, अमळनेर ),मा. प्रशांत मनोहर निकम,( उपनगराध्यक्ष, अमळनेर नगरपरिषद) ,मा. अॅड. व्ही. आर. पाटील, (माजी जि. प. सदस्य, जळगाव ),मा. विक्रांत भास्करराव पाटील,( माजी नगरसेवक, अमळनेर) डॉ. अविनाश रघुराज जोशी,(अध्यक्ष, मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेर ),डॉ. डिगंबर विठ्ठल महाले, (अध्यक्ष, मंगळग्रह मंदिर संस्थान, अमळनेर) मा. सचिन बाळू पाटील,(संचालक, कृ.उ.बा.स., अमळनेर ) ,(मा. अमेय प्रकाश मुंदडा, मुंदडा बिल्डर्स, अमळनेर) ,मा. सौ. रिता भुपेंद्र बाविस्कर, (प्रदेशाध्यक्ष, रा.काँ. ग्रंथालय विभाग ),मा. प्रविण गंगाराम पाटील ( राजू फापोरेकर), नगरसेवक, अमळनेर , मा. सचिन बळवंत पाटील,( नगरसेवक, अमळनेर), ज्ञानेश्वर धनगर (माजी तज्ज्ञ संचालक बाजार समिती, अमळनेर), जयेशकुमार काटे (संस्थापक अध्यक्ष शिवशाही फाउंडेशन, अमळनेर ) मा. प्राचार्य रत्नाताई पाटील, (खजिनदार, खान्देश साहित्य संघ, महा.),मा. रमेश आप्पा बोरसे, (सचिव, खान्देश साहित्य संघ, महा.) उपस्थित राहणार आहेत खान्देश साहित्य संघाला नेहमीच मार्गदर्शक साहित्यिक मा. श्री. कृष्णा आनंदा पाटील, (साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त),मा. श्री. सुभाष मोतीराम पाटील, (जेष्ठ साहित्यिक, मा. श्री. हिरामण अभिमन कंखरे, (जेष्ठ कवी), मा. श्री. गोकुळ गोविंदा बागुल, (अहिराणी साहित्यिक ),मा. श्री. शाहीर नाना पाटील, (अहिराणी साहित्यिक) मा. श्री. भाऊसाहेब देशमुख, (साहित्यिक) यांचे मार्गदर्शन असते. या पत्रकार परिषदेस खान्देश साहित्य संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सदाशिव सूर्यवंशी, पू सानेगुरुजी शिक्षक साहित्य संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय पाटील ,कार्याध्यक्ष डॉ कुणाल पवार , साहित्य संघाचे जिल्हाध्यक्ष शरद धनगर ,कार्याध्यक्ष वाल्मिक मराठे, उपाध्यक्ष डी ए धनगर , सचिव उमेश काटे यांच्यासह साहित्य संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. तरी सर्व पत्रकार बंधूनी या आखाजी महोत्सवात आवर्जून उपस्थित राहून खान्देशी संस्कृतीचा आनन्द लुटावा आणि वृत्त प्रसिद्ध करावे ही नम्र विनंती. खान्देश साहित्य संघ जळगाव जिल्हा

    या महोत्सवाच्या माध्यमातून आपल्याला खान्देशी लोककला, गाणी आणि परंपरांचे दर्शन घडणार आहे. विशेषतः महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे म्हणून अध्यक्ष प्रा.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    error: Content is protected !!